असं म्हणतात ना आपल्याला यश आणि अपयश हे दोन्ही पचवता आलं पाहिजे. मात्र नेमकं हेच कपिलला जमलं नाही. गाजावाजा करत कपिल शर्माने 'फॅमिली टाईम विथ कपिल' हा नवा शो सुरू केला. पण कपिलच्या आधीच्या शोच्या तुलनेत या शोचा टीआरपी फारच कमी आहे. शिवाय या शोचे एपिसोड तयार नसल्यामुळे हा शो बंद करण्याचा निर्णय चॅनेलने घेतला आहे.
कपिल आणि सुनील ग्रोवरमधील भांडण जगजाहीर आहे. एक वेळ अशी होती की कपिल आणि सुनील ग्रोवर या जोडगोळीचा 'कॉमेडी नाइट विथ कपिल' हा शो टीआरपीमध्ये पहिल्या स्थानावर होता. त्यामुळे सहाजिकच कपिलच्या या नवीन शोमध्ये प्रेक्षकांनी सुनीलला खूप मिस केलं. सुनील शिवाय कपिलला देखील प्रेक्षकांवर छाप पाडता आली नाही. त्यामुळे लवकरच कपिलचा शो पुन्हा एकदा ऑफएअर जाऊ शकतो.
शिवाय कपिलकडे या शोचे एपिसोडही तयार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या कपिल चॅनलच्या एकाही कॉलला उत्तर देत नाही. त्यामुळे चॅनलने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्याला एका पत्रकाराने शिवीगाळ व खंडणीसाठी फोन केल्याचा आरोप करत कपिलने ओशिवरा पोलिस ठाण्यात वकिलामार्फत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत त्याने आपल्याला विकी लालवाणी या पत्रकाराने फोन करून तसंच ट्विटरच्या माध्यमातून धमकावल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा-
कपिल शर्माची पत्रकाराविरोधात तक्रार