Advertisement

‘बोगदा’मधील 'या' दृश्यात सुहास जोशींनी राखला संयम

साठीच्या सुहास जोशी चित्रीकरणासाठी बोटीत बसल्या असताना, बोट पाण्यात उलटू नये यासाठी खालच्या बाजूला दोन टायर लावण्यात आले होते. मात्र, बोट काही अंतर दूर गेल्यानंतर तिचा एक टायर फुटला. त्यामुळे, अचानक समतोल बिघडल्यामुळे बोट पाण्यात हेलकावे घेऊ लागली.

‘बोगदा’मधील 'या' दृश्यात सुहास जोशींनी राखला संयम
SHARES

कोणताही सिनेमा पडद्यावर पाहताना जेवढा उत्कृष्ट भासतो त्याहीपेक्षा वेगळे अनुभव तो बनत असताना कलाकार आणि इतरांना देत असतो. या ऑफ स्क्रिन अनुभवांतूनच बऱ्याचदा कलाकार समृद्ध होत असतो. ‘बोगदा’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान असेच काहीसे अनुभव ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना आले.


गोलाकार बोटीत थरारक अनुभव 

या सिनेमातील एका महत्वपूर्ण सीनसाठी सुहास यांना गोलाकार बोटीत बसायचं होतं. नदीच्या एका किनाऱ्यावरून ती बोट (चप्पू) दुसऱ्या किनाऱ्यावर जाते, असा तो सीन होता. पडद्यावर आकर्षक वाटणारा हा सीन वास्तव्यात साकारताना सुहास यांना थरारक अनुभव आला. बोट गोलाकार असल्याने त्यात फक्त नावाडी आणि सुहास जोशीच बसू शकत होत्या. त्यात जर थोडी चूक झाली, तर बोटीचा तोल जाण्याची दाट शक्यता होती. त्यावेळी त्यांच्या संयमतेचा प्रत्यय सर्वांनाच आला.

बोट हेलकावे घेऊ लागली

साठीच्या सुहास जोशी चित्रीकरणासाठी बोटीत बसल्या असताना, बोट पाण्यात उलटू नये यासाठी खालच्या बाजूला दोन टायर लावण्यात आले होते. मात्र, बोट काही अंतर दूर गेल्यानंतर तिचा एक टायर फुटला. त्यामुळे, अचानक समतोल बिघडल्यामुळे बोट पाण्यात हेलकावे घेऊ लागली. सर्व टीमने धावपळ करत दोरीने बोट पुन्हा किनाऱ्यावर सुखरूप आणण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. सुहास जोशीचं वय लक्षात घेता, त्या पाण्यात पडू शकल्या असत्या. मात्र, त्यांनी न डगमगता संयमाने ती परिस्थिती हाताळली. इतकंच नव्हे, तर पुढच्या रिटेकसाठी त्या लगेच तयारदेखील झाल्या. ‘बोगदा’ सिनेमातील हा सीन प्रेक्षकांना नक्कीच भावूक करणारा ठरेल असा आहे.


स्त्रीप्रधान सिनेमा

सहजसुंदर अभिनय कौशल्याच्या जोरावर सुहास जोशी यांनी मराठी आणि हिंदीमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘बोगदा’ चित्रपटात त्यांच्या कलागुण, कौशल्याचे वेगळे पैलू प्रेक्षकांना पहायला मिळतील. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केलं असून, नितीन केणी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद आणि निशिता केणी यांनी केली आहे.



हेही वाचा-

‘सिम्बा’ने झापण्यासारखं सौरभने केलं तरी काय?

सुमित उघडणार लागूंच्या अदाकारीचा ‘पिंजरा’



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा