Advertisement

'तुझं माझं ब्रेकअप' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' प्रेक्षकांच्या भेटीला


'तुझं माझं ब्रेकअप' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

सध्या झी मराठीवर 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेचे प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावरून झी मराठीवरील 'खुलता कळी खुलेना' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचं समजत आहे. पण आता झी मराठी वाहिनीवर अजून एका मालिकेचा प्रोमो दिसायला सुरूवात झाली आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' असं त्या मालिकेचं नाव आहे. 

त्यामुळे आता नक्की कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा संभ्रमात प्रेक्षक असतानाच त्या मालिकेत नाव आम्हाला समजलं आहे. मुंबईची मुलगी आणि युपीचा मुलगा असलेल्या गौरी आणि शिव यांच्या प्रेमाची कथा असलेली 'काहे दिया परदेस' ही मालिका ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजलयं.



सध्या काहे दिया परदेस मालिकेत सगळेच सगळ्यांशी गोड वागत आहेत. त्यामुळे मालिकेचा हॅप्पी एन्ड होऊन ती मालिका संपणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिका 'खुलता कळी खुलेना' आणि ' काहे दिया परदेस' या मालिकेची जागा आता 'तुझं माझं ब्रेकअप' आणि 'स्वराज्य रक्षक संभाजी' या नवीन मालिका घेणार आहेत.



'तुझं माझं ब्रेकअप' ही मालिका लग्न झालेल्या जोडप्याची एकमेकांबरोबर दुसरं लग्न करण्याची गोष्ट असणार आहे. 'रात्रीस खेळ चाले' मध्ये 'अभिराम' ही व्यक्तिरेखा साकारणारा सायंकित कामत आणि केतकी चितळे ही नवोदित अभिनेत्री या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका ऐतिहासिक विषय हाताळणार असून इतिहासाच्या पानात घडून गेलेल्या गोष्टी दाखवणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा