Advertisement

मुंबई, कोकण किनारपट्टीसाठी पुढचे ५ दिवस आॅरेंज अलर्ट

मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील.

मुंबई, कोकण किनारपट्टीसाठी पुढचे ५ दिवस आॅरेंज अलर्ट
SHARES

मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाचे जयंता सरकार यांनी दिली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसंच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित आणि अनपेक्षितरित्या घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

विशेषत: दरडीकोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचं लक्ष असलं तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल इथं टेकडीचा भाग अचानक खचला होता.

उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावं.

हेही वाचा- पुढील ३ ते ४ तास ठाणे आणि रायगडसाठी महत्वाचे; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसलं व वाहनांचं नुकसान झालं आहे तसंच भांडूप इथं जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली आहे. हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी.

पावसाचा (mumbai rains) जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि काल झालेल्या पावसाने लक्षात आलं आहे. हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रणा, कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावं.

पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा.

सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावं.

कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावं.

अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेलं राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारखे रोग पसरवू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावं, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या.

हेही वाचा- मुसळधार पावसामुळं मुंबईत ३३ बळी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा