मुलुंड - गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाची बॅटींग सुरु आहे. त्यामुळे मुलुंडच्या रस्त्यांवर रिक्षांचे प्रमाणही कमी होते. सततच्या पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पावसाचा फटका मुंबईच्या लाईफलाईनवरही झालेला दिसून आला. वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरच्या लोकल 5 ते 10 मिनिटे उशीराने धावत होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. तसेच शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसला.