दिव्यांना प्रकाशाचे प्रतिक मानले जातं. दिव्यांची ज्योत स्वत: जळून दुसऱ्यांचं आयुष्य प्रकाशमय करते. तसंच काहीसं काम मुंबईत राहणारे कल्याणा रमण यांनी केलं आहे. त्यांच्या शेणांच्या दिव्यांच्या संकल्पनेमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
मुंबईत राहणारे कल्याणा रमन यांना २०१७ साली शेणाच्या दिव्यांची संकल्पना सुचली. त्यांना कळाले की शेतकरी गाईचं शेण ५० पैशात किलोग्राम विकायचे. तेव्हा संकल्पनेवर काम करून त्यांनी गाईंच्या शेणापासून पणत्या तयार केल्या. फक्त पणत्या तयार केल्या नाहीतर तर त्यावर संशोधन देखील केलं. या पणत्यांचा पर्यावरणाला कसा फायदा होईल? लोकांच्या आरोग्यावर कसा चांगला परिणाम होईल याचं संशोधन केलं.
कल्याणा रमण यांनी पंचगव्य असं नाव या पणत्यांना दिलं आहे. कारण गाईपासून मिळणाऱ्या ५ घटकांचा यात समावेश आहे. गाईचे दुध, गोमूत्र, शेण, दही आणि तूप यांच्यापासून पंचगव्य दिवे तयार केले जातात. हे दिवे जैव विघटनशील आहेत.
कल्याणा रमण यांच्या संकल्पनेमुळे आनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागात अनेक महिला दिवसाला १२०० पणत्या बनवून देण्याचं काम करत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांकडून शेण विकत घेतल्यानं त्यांना देखील फायदा होत आहे.
देशातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. पण योग्य दरात शेण विकून शेतकरी पैसा कमावत आहे. यात शेतकऱ्यांचा, दिवे बनवणाऱ्या कारागारांचा फायदा आहे. जवळपास १५० गावांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार उपलब्ध झाला आहे. एकप्रकारे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं उचलेलं एक पाऊल आहे.
कल्याणा रमण
दिवे बनवण्यासाठी खासप्रकारचं मशीन बनवण्यात आलं आहे. मशीनच्या मदतीनं दबाव तंत्राचा वापर करून दिव्याच्या आकाराच्या पणत्या तयार केल्या जातात. IIT बॉम्बेच्या दोन प्राध्यापकांच्या मदतीनं ही मशीन बनवण्यात आली आहे.