राज्यात मंगळवारी ८ हजार ४१८ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर १० हजार ५४८ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसंच१७१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ५८,७२,२६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,२९,०८,२८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,१३,३३५ (१४.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३८,८३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ४४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १,१४,२९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
ठाणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १६ हजार ६७० आहे. पुण्यात एकूण १६ हजार ५२४, कोल्हापुरात १२ हजार ९८८, सांगलीत ८७०, साताऱ्यात ७ हजार २७१, रत्नागिरीत ५ हजार ०८३, रायगडमध्ये ४ हजार ५१७, सिंधुदुर्गात ४ हजार ०८६, नागपूरमध्ये २ हजार ६५९ तर नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३१९ इतकी आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
हेही वाचा -
भारतात ऑगस्टपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येणार, एसबीआय रिसर्चच्या अहवालात उघड