राज्यात नवीन कोरोना रुग्णांची संख्या २० हजारांच्या खाली आली आहे. रविवारी कोरोनाचे नवीन १८ हजार ६०० रुग्ण आढळले. मागील ४५ दिवसांतील ही सर्वाधिक कमी आकडेवारी आहे. या आठवड्यात राज्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
रविवारी ४०२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर २२,५३२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ५३,६२,३७० कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ९३.५५ टक्के रिकव्हरी रेट आहे. तर मृत्यूदर १.६५ टक्के आहे. एकूण ४०२ मृत्यूंपैकी २७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. राज्यात एकूण २,७१,८०१ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत रविवारी १०६६ नवे रुग्ण आढळले. तर १३२७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत सध्या एकूण सक्रिय रुग्ण २७३२२ आहेत. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४१४ दिवसांवर गेला आहे.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४८,६१,६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,३१,८१५ (१६.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,९८,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. १२,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील