नवी मुंबईत मंगळवारी (११ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन २७८ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १९ हजार ०३३ झाली आहे.
मंगळवारी बेलापूर ३९, नेरुळ ५७, वाशी २८, तुर्भे १३, कोपरखैरणे ३० घणसोली ४२, ऐरोली ६५, दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर ८०, नेरुळ ६५, वाशी ४९, तुर्भे ३६, कोपरखैरणे ५९, घणसोली ४२, ऐरोली २२ आणि दिघामधील ४ रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५१७३ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ४७८ झाला आहे.
नवी मुंबईत सध्या ३३८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८० टक्के झाला आहे. नवी मुंबईत एकूण ७५,३२७ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.
महापालिकेच्या वतीने प्रतिजन तपासण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आल्याने शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांसाठी लागणारी पालिकेची आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर शहरातील करोना रुग्णाला दूरध्वनीवरून खाटा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. यासाठी ऑनलाइन माहितीफलक तयार केला जात आहे.
धारावीत १० दिवसांत एकही मृत्यू नाही