राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ४ हजार ५०५ रुग्ण आढळले. तर ७ हजार ५६८ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच दिवसभरात ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील हा निचांक आहे.
राज्यात मृत्यूदर गेल्या काही दिवसांपासून २.०१ टक्क्यांवर स्थिरावला आहे. तर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ५१ हजार ९५६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७६ टक्के झाले आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ९७ लाख २५ हजार ६९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ५७ हजार ८३३ (१२.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २१ हजार ६८३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६८ हजार ३७५ इतकी आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १४ हजार १४९ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार २७१ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर साताऱ्यात ही संख्या ६ हजार ८८८ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ६४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार १३० तर सोलापुरात ५ हजार ९५६ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील