राज्यात सोमवारी कोरोनाचे नवीन ४७ हजार २८८ रुग्ण आढळले. रविवारी हा आकडा ५७ हजार ०७४ इतक होता. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे.
सोमवारी १५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार २५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ५१ हजार ३७५ वर जाऊन पोहचली आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण २५ लाख ४९ हजार ०७५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३६ टक्क्यांवर आले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा