महाराष्ट्रात (maharashtra) मंगळवारी कोरोनाचे (coronavirus) नवीन ८ हजार ४७० रुग्ण आढळले. तर ९ हजार ४३ रूग्ण बरे झाले आहेत. तसंच १८८ रुग्णांचा मृत्यू (death) झाला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण ५७,४२,२५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९८,८६,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,८७,५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५८,८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २३ हजार ३४० झाली आहे. मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची १४,४५३, पुण्यात १६ हजार ९५५ तर ठाणे जिल्ह्यात १३ हजार ५७० आहे. कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ०२३ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ७७२ इतकी झाली आहे.
नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ५६३, अहमदनगरमध्ये ३ हजार ९८७, औरंगाबादमध्ये २ हजार ०७९, नांदेडमध्ये १ हजार ०२२, जळगावमध्ये १ हजार ७३६, रायगडमध्ये ४ हजार ३३९, अमरावतीत ७४९ इतकी आहे. सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात १२७ आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
हेही वाचा -
लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी; ३० ते ४४ वयोगटाच्या मोफत लसीकरणात गोंधळ