Advertisement

राज्यातील बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात- सुनील केदार

महाराष्ट्रात बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

राज्यातील बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात- सुनील केदार
SHARES

महाराष्ट्रात (maharashtra) बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

राज्यात १६ फेब्रुवारी २०२१ रोजी जळगाव जिल्ह्यात ३८ आणि नंदूरबार जिल्ह्यात ३१, असे एकूण ६९ कोंबड्यांचे मृत्यू झाले. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य इतर एका पक्षाची आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये राज्यात मृत्यू आढळून आले नाहीत. महाराष्ट्रात १६ फेब्रुवारी २०२१ रोजी एकूण ७० पक्षांमध्ये मरतुक झाली आहे. हे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचं सुनील केदार (sunil kedar) यांनी सांगितलं.

कोंबड्या आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, क्षेत्रास “नियंत्रित  क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कोंबड्या, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्ठा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ७,१२,१७२ कोंबड्या (यात नवापूर जि. नंदूरबार येथील ५,७८,३६० पक्षी समाविष्ट); २६,०३,७२८ अंडी व ७२,९७४ किलो खाद्य नष्ट करण्यात आलं आहे.  महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी याप्रमाणे नष्ट करण्यात आलेल्या अंडी, खाद्य व पक्ष्यांच्या मालकांना देण्यासाठी रु.३३८.१३ लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे.

हेही वाचा- कोण म्हणतंय संजय राठोड बेपत्ता आहेत?- अजित पवार

सर्व कुक्कुट पक्षीधारकांनी जैव सुरक्षा उपाययोजनांचं तंतोतंत पालन करावं. कोंबड्या विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन सुनील केदार यांनी केलं.

अफवा टाळा

अफवा व गैरसमजुतीमुळे कोंबड्यांचं मांस आणि अंडी खाणं नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये कोंबड्यांचं मांस व अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे.  पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेलं कोंबड्यांचं मांस आणि उकडलेली अंडी खाणं सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येऊ नयेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

(bird flu in control in maharashtra says minister sunil kedar)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा