Advertisement

अरे बापरे ! दिवसभरात 105 जणांच्या मृत्यूची नोंद, 2190 नवे रुग्ण

आतापर्यंत राज्यभरात 17 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

अरे बापरे !  दिवसभरात 105 जणांच्या मृत्यूची नोंद, 2190 नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 56हजार 948 झाली आहे. आज 2190 नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 964  कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 17 हजार 918 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 37 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 3 हजार 976 नमुन्यांपैकी 56 हजार  948 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 82 हजार 701 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 37 हजार 761 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात 105  कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1897 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 32, पुण्यात 9, नवी मुंबई 7, रायगड, 7 जळगाव 16, ठाणे 16, अकोला 6, औरंगाबाद 4 , सोलापूर 3, नाशिक 3,  सातारा 2,  अहमदनगर, पनवेल, नंदूरबार, नागपूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माञ आज नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंमध्ये 39 मृत्यू हे मागील दोन दिवसातील असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. 

आज नोंद झालेल्या 105 मृत्यूंपैकी 72  पुरुष तर 33 महिला आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 50 रुग्ण आहेत तर 45  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 10 जण 40 वर्षांखालील आहे. या 105  रुग्णांपैकी 66 जणांमध्ये ( 67 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

(टीप- आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील  दिनांक 7 मे 2020 पासूनच्या 269 रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)*

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2345 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16 हजार 414 सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 65.91  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा