Advertisement

महाराष्ट्रात कोविड रुग्णांच्या संख्येत २०% वाढ, 'हे' आहे कारण

महाराष्ट्रातात कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारी २०% वाढ पाहायला मिळाली.

महाराष्ट्रात कोविड रुग्णांच्या संख्येत २०% वाढ, 'हे' आहे कारण
SHARES

महाराष्ट्रातात कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारी २०% वाढ पाहायला मिळाली. कारण अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण सापडण्याच्या आकड्यात वाढ झाली आहे.

गेल्या पाच दिवसांमध्ये गणपती उत्सवांमुळे कोविड चाचण्या कमी झाल्या होत्या. राज्याच्या आरोग्य विभागानं जिल्ह्यांना चाचण्यांच्या संख्या वाढवण्यास सांगितलं आहे. दररोज सरासरी २.५ लाख चाचण्या घेतल्या गेल्या, १२ सप्टेंबरला हा आकडा १.१ लाख इतका होता. तर १३ सप्टेंबरला १.४ लाखांच्या घऱात चाचण्या घेण्यात आल्या.

मुंबईत, पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सणांमुळे सुट्ट्या होत्या. यामुळे चाचण्यांमध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे.

"परंतु आम्ही इतर काही जिल्ह्यांपेक्षा दररोज मोठ्या संख्येनं चाचण्या घेत आहोत," पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. मंगळवारी पालिका कोविड अद्यतनात म्हटलं आहे की मागील दिवशी २८ हजार ४९८  चाचण्या घेण्यात आल्या, परिणामी ३६७ प्रकरणं आणि चाचणी सकारात्मकता दर १.२ टक्के आहे.

त्यापैकी सहा मुले जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील ओबेरॉय स्प्लेंडर सोसायटीतील होती. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितलं की, मुलांनी वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. "त्यापैकी एकाला लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी झाली आणि ते पॉझिटिव्ह आले," ती म्हणाली, मुले वेगवेगळ्या इमारतींमधील होती.

२४ तासांच्या कालावधीत शहरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ५ हजार ०३३ वरून ५ हजार ३९३ वर गेली. राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ राहुल पंडित म्हणाले की, प्रवासावरील निर्बंध हटवल्यानंतर एका आठवड्यानंतर शहराचा कोविड आलेख बदलू लागला.

“पहिल्या आठवड्यात प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ लक्षात येण्यासारखी नसली तरी पुढील दोन आठवड्यांत केसलोड २०-३०% वाढले. याक्षणी, असं दिसतं की दररोज सुमारे ३५० प्रकरणं समोर येतील.

राज्यात, १ ते १४ सप्टेंबर हा कदाचित सर्वात मोठा कालावधी असेल जेव्हा विदर्भानं साथीच्या रोगाची सुरूवात झाल्यापासून कोविड मृत्यूची नोंद केली नसेल. नागपूर आणि अमरावती इथं प्रत्येकी शेवटचा मृत्यू ३१ ऑगस्ट रोजी नोंदवला गेला.

गेल्या महिन्यात ११ जिल्ह्यांत फक्त २१ मृत्यू नोंदवले गेले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सणासुदीनंतर काही प्रकरणांमध्ये वाढ झाल्यास ते तपासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाईल.



हेही वाचा

महिलांच्या लसीकरणावर भर देणार, आठवड्यातील एक दिवस महिलांसाठी राखीव

मुंबईत २४ तासात आढळले ५१४ कोरोनाबाधित

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा