मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं हजेरी लावत मुंबईला झोडपून काढलं. पावसाच्या पाण्यामुळं मुंबईचे रस्ते जलमय झाले होते. परिणामी, साचलेल्या पाण्यामुळं पावसाळी आजारांनी डोक वर काढलं आहे. मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळं लेप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जूनच्या तुलनेत जवळपास दुपटीहून अधिक वाढली आहे. तसंच, स्वाइन फ्लूसह हिवतापाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
यावर्षी जुलैमध्ये सलग झालेल्या पावसानंतर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. या साचलेल्या पाण्यामधून प्रवास केल्यामुळे ३७ जणांना लेप्टोची बाधा झाली आहे. या वर्षभरात जुलैपर्यंत लेप्टोस्पायरोसिसचे ९६ रुग्ण आढळले असून एका मृत्यूची नोंद आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात कोरोनामुळं साथीच्या आजारांचे प्रमाण फार कमी नोंदले होते.
डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जुलैमध्ये १२ वरून ४८ वर गेली आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णाची संख्या ही आता वाढायला सुरुवात झाली असून, जूनमध्ये केवळ ५ रुग्ण होते. जुलैमध्ये या रुग्णांची संख्या २१ वर गेली आहे. दूषित पाणीपुरवठ्यामुळं गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येत आहे. जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे २९४ रुग्ण आढळून आले आहेत.
दरवर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण वाढतं. यंदाही ती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
हिवतापाचे ५५७ रुग्ण
मुसळधार पावसानंतर ठिकठिकाणी साचून राहिलेल्या पाण्यामुळं डासांचा उपद्रव वाढला असून, यामुळं हिवतापाच्या रुग्णसंख्येतही जूनच्या तुलनेत वाढ झाली आहे. जुलैमध्ये हिवतापाचे ५५७ रुग्ण आढळले आहेत.
असा टाळा डेंग्यू