पावसाळ्यात मुंबईकरांना आता आणखी एक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईत पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
गेल्या आठवडाभरात पावसाळ्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या दुपटीने वाढली आहे. गेल्या आठ दिवसांत लेप्टोच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ झाली आहे. या महिन्यात लेप्टोचे 11 रुग्ण आढळले आहेत. यासह 33 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.
मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणे
जर तुम्हाला 2-3 दिवसांपेक्षा जास्त ताप असेल तर तुम्हाला संसर्गजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असते. तसेच सर्दी, पुरळ, डोकेदुखी होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. हे लक्षण तुम्हाला जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. ही लक्षणे मलेरिया, डेंग्यू असू शकतात. पावसाळ्यात लहान मुले आणि वृद्धांकडे विशेष लक्ष द्या.
कावीळ होण्याची शक्यता
तुम्हाला ताप, उलट्या, जुलाब आणि तुमचे डोळे पिवळे दिसत असल्यास, तुम्हाला कावीळ होऊ शकते. अशा परिस्थितीत कोणताही घरगुती उपाय न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अशी काळजी घ्या
आहारात या पदार्थांचा समावेश असावा