राज्यात सुरूवातीला कोरोनाचा फैलाव मुंबईत वेगाने होत होता. मात्र, आता मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. पण मुंबई नजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, पनवेल, मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. ८ जूननंतर राज्यभरात लाॅकडाऊन हटवण्यात आला. मात्र, त्यानंतर या अनलाॅकच्या काळात रुग्णसंख्या वेगाने वाढली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी या शहरांमध्येही पुन्हा लाॅकडाऊनही लागू करण्यात आला. मात्र, या लाॅकडाऊनचाही फारसा परिणाम नसल्याचं दिसून आलं. लॉकडाऊन असतानाही मुंबईनजीकच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली.
जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे २६२४ रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईतीलही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लाॅकडाऊन हटवल्यानंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एका महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ५ हजार ४५५ ने वाढली आहेत.
एका महिन्यात नवी मुंबईतील मृत्यूदर ३.१३ टक्के वरून ३.२६ टक्के झाला आहे. राज्य शासनाने ८ जूननंतर मिशन बिगीन अगेन सुरू केले. अनलाॅक झाल्यानंतर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले. मात्र, मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे अशी बेफिकीरी लोक दाखवत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे ९ जुलैपर्यंत एका महिन्यात रुग्णसंख्या वेगाने वाढली. ९ जूनला नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ३०६३ होती. तर मृतांचा आकडा ९६ होता. ९ जुलैला रुग्णांची संख्या ८५१८ वर गेली आहे. म्हणजे एका महिन्यात तब्बल ५ हजार ४५५ रुग्ण वाढले आहेत. महिनाभरात रोज सरासरी २०० च्या जवळपास नवे रुग्ण वाढले आहेत.२ ते १९ जुलै रुग्णवाढ
शहर रुग्णवाढ
कल्याण-डोंबिवली ८,९८२
ठाणे ६,५७८
नवी मुंबई ४,६०३
उल्हासनगर ३,५४४
मीरा-भाईंदर ३,२५१
अंबरनाथ १,२४४
बदलापूर १,११९
भिवंडी १,०७३