Advertisement

कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात राजेश टोपे म्हणतात...

देशभरासह राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात राजेश टोपे म्हणतात...
SHARES

देशभरासह राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली ही समाधानाची बाब आहे. असे असले तरी चौथी लाट टाळायची असेल तर संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत.

राजेश टोपे यांनी कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं असलं तरी सर्वांना लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे.

ते म्हणाले की, 'नवीन केसेसची संख्या कमी झाली आहे ही सर्वात महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे. राज्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या २० हजारांच्या खाली गेली आहे. एकेकाळी तिसरी लाट एवढी मोठी होती की एकावेळी ४८ हजार नवीन रुग्ण समोर येत होते. सक्रीय रुग्णसंख्या तर काही लाखांमध्ये होती. या सर्व पार्श्वभूमीवर समाधानाची बाब ही आहे की केसेस कमी झाल्यात आणि लसीकरणाचे प्रमाण खूप चांगलं आहे'.

तसंच पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांना मनापासून विनंती आहे की, त्यांनी पूर्ण लसीकरण करून घ्यावे. जे बुस्टर डोससाठी पात्र आहेत, त्यांनी तो डोस घ्यावा. १५ ते १८ वयोगटातील लोकांनी देखील लसीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसंच खऱ्या अर्थानं चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित राहायचे असेल तर त्यांनी लसीकरण करुन घेणं काळाची गरज आहे.

'कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी देखील अगदीच कमी झाले असे काहीही नाही. मात्र मार्च महिन्यात आता असलेले निर्बंध हटवण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. परिस्थिती पाहून लागू असलेले छोटे-मोठे असे सर्वच निर्बंध १०० टक्के हटवण्यात येऊ शकतात.


हेही वाचा

राज्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता, दोन दिवसात निर्णय

ठाण्यातील 'या' भागात बर्ड फ्लू, ३०० कोंबड्यांचा मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा