Advertisement

तुम्हाला आहे का विसरण्याचा आजार?


तुम्हाला आहे का विसरण्याचा आजार?
SHARES

आपण कधी काय विसरु शकतो, याचा आपल्यालाही अंदाज येत नाही. पण, कधी अति विसरणं हे ही धोकादायक ठरु शकतो. याचाच एक प्रकार म्हणजे अल्झायमर...कदाचित नावाने तुम्हाला या आजाराचं महत्त्व कळणार नाही. पण, खरंतर हा आजार म्हणजे विस्मृतीचा रोग....जगभरात 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर म्हणजेच स्मृतिभ्रंश जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो.


अल्झायमर म्हणजे नेमकं काय?

अल्झायमर रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते. हा आजार वयाच्या तिसाव्या वर्षी देखील होऊ शकतो. पण, 60 वर्षानंतर या आजाराचं निदान होतं. तसंच वाढत्या वयाबरोबर हा आजार होण्याचा धोका वाढतो.


जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार-

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी झाली असून ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. एकट्या भारतात, साडे चार दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमरचा एखादा प्रकार आढळून आला आहे. भारतात आलेल्या आधुनिक वैद्यकीय क्रांतीमुळे भारतीयांचे जीवनमान ८० च्या पुढे जात असून या वयातील लोकसंख्येच्या ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्मृतिभ्रंश हा वाढत्या वयानुसार वाढत जातो. पण, भारतात आजही ५० टक्क्याहून अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. अल्झायमर रोगाचे सुरुवातीला निदान करणे कठिण असते. वाढत्या वयामुळे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. पण, वार्धक्य आणि आनुवंशिकता यामुळे हा रोग होण्याची शक्यता असते.

डॉ. शिरीष हस्तक, ग्रुप डायरेक्टर, न्यूरोलॉजी अॅण्ड स्ट्रोक विभाग, वोक्हार्ट


हे उपाय करा -

वयाची साठी उलटल्यानंतर जीवनपद्धतीत बदल करून घेतला पाहिजे.

नित्य नवे विषय समजून घेणे, समजलेले स्मरण, चिंतन करणे, दुसऱ्याला समजावून देणे, हास्यक्लबमध्ये जाणे, सहलीला जाणे, विश्वासू व्यक्तीच्या मदतीने पैशांचे व्यवहार करणे असे उपचार केलात तर मेंदूमधील संबंधित चेतापेशींना चांगला व्यायाम घडतो आणि त्या पुन्हा कार्यक्षम होतात.


अल्झायमरची लक्षणे -

सुरुवातीला रुग्णाला नुकत्याच घडलेल्या घटनाही आठवत नाहीत.

नेहमीचा रस्ताही विसरतो.

त्या व्यक्तीला निरनिराळे भास होतात.

मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते.

वाचणे, लिहिणे, बोलणे, चालणे यांची क्षमता कमी होते.

नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते.

शेवटी स्नायू र्‍हासामुळे सर्व हालचाली मंदावतात.


80 वर्षावरील 80 टक्के वृद्ध या आजाराने त्रस्त

सामान्यपणे 80 वर्षांवरील 50% वृद्ध अल्झायमरग्रस्त आढळून येतात. म्हतारपण आलं की स्मरण शक्ती कमी होतेच, हे गृहीत धरून सर्व व्यवहार चालतात.  पण, खरी गरज आहे ती अशा रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार देण्याची...



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा