Advertisement

जगभरात मृत्युदर अत्यंत कमी, नागरिकांनी घाबरू नये - राजेश टोपे

ऑमिक्रॉनमुळं सर्वत्र भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात आतापर्यंत ऑमिक्रॉनचे १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जगभरात मृत्युदर अत्यंत कमी, नागरिकांनी घाबरू नये - राजेश टोपे
SHARES

ऑमिक्रॉनमुळं सर्वत्र भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. राज्यात आतापर्यंत ऑमिक्रॉनचे १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसंच, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ६५ जणांचे नमुने पाठविण्यात आले असून, रुग्णांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

''जगभरात मृत्युदर अत्यंत कमी आहे, त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परिस्थिती दिसते तशी नाही. आपण केंद्र सरकारच्या सूचनांनुसार काम करत असून, तशा उपाययोजना केल्या जात आहेत'', असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन ओमिक्रॉनसंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात १० रुग्णांना नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. तर ६५ जणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

''रुग्णांची प्रकृती ठीक आहे. आपण केवळ आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत नव्या विषाणूचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याचे म्हणायचो. मात्र, आताची परिस्थिती बघितली तर जगातील ६४ देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत'', असं त्यांनी सांगितलं.

''यूकेमध्ये ओमिक्रॉनचे दिवसाला सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत, त्यापाठोपाठ फ्रान्स, दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्या अधिक आहे. यातुलनेत राज्याची परिस्थिती सांगताना त्यांनी, राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांवर भर दिला. विमानतळांवर स्क्रीनिंगची काळजी घेतली जात आहे. जे पॉझिटिव्ह आहेत, ते हायरिस्क, नो रिस्क देशांतून येत आहेत का, ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जात आहे. आपण विमानतळांवरच स्क्रीनिंगचे प्रमाण वाढवले आहे.''

''जे प्रवासी बाहेरील देशांतून आले आहेत, त्यावर लक्ष ठेवलं जात आहे. मृत्युदर जगात बघितला तर, अतिशय कमी आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये. परिस्थिती अजिबात तशी नाहीत. आपण उपाययोजना करत आहोत. विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या काही प्रवाशांचा शोध किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही'', याबाबतही त्यांनी माहिती दिली.

''प्रवासी आले असतील आणि त्यांच्याशी संपर्क होत नसेल तर, धोका नक्कीच आहे. काही लोकांना असे वाटते की, आम्ही सापडलो तर, जाचक प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. पण असं काही नाही. अशा प्रवाशांचा शोध घेण्याचे प्रयत्न सर्वच यंत्रणा करत आहेत. ज्यांच्याशी संपर्क होत नसेल त्यांचा शोध सुरू आहे'', असे टोपे यांनी सांगितले.

आतापर्यंत १२ कोटींहून अधिक नागरिकांना पहिला डोस दिला आहे. हे प्रमाण ८४ टक्के आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ४६ टक्के आहे. लसीकरणानंतर संसर्ग झाला तरी, त्याचा धोका नसतो. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले.

विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीचे दर अधिक आकारले जात आहेत. ते कमी करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्न करत आहोत. जिथे पाच हजारांच्या आसपास दर आकारले जातात, ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही टोपे यांनी सांगितले.

लहान मुलांचं लसीकरण आणि बुस्टर डोसची मागणी आपण याआधीही केलीय. उद्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत असून, या बैठकीत राज्याच्या वतीने पुन्हा मागणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा