Advertisement

मुंबईचा सुनियोजित विकास करणार- उद्धव ठाकरे

मुंबईतील पर्यावरणाचं जतन करत पायाभूत सुविधांची कामे करण्यावर भर देण्यात येत आहे. या मुंबईचा सुनियोजित विकास करणार, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

मुंबईचा सुनियोजित विकास करणार- उद्धव ठाकरे
(Twitter)
SHARES

मुंबईतील पर्यावरणाचं जतन करत पायाभूत सुविधांची कामे करण्यावर भर देण्यात येत आहे. या मुंबईचा सुनियोजित विकास करणार, असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिलं.

एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचं उद्घाटन, शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन,बीकेसी सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचं लोकार्पण तसंच स्मार्ट वाहनतळाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा यापुढे सुनियोजित विकास करण्यावर भर देण्यात येईल. एमएमआरडीएची पायाभूत सुविधांची कामे आव्हानात्मक आहेत. मुंबईत वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर स्मार्ट पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी पार्किंगची व्यवस्था देखील आधुनिक पद्धतीने करावी लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देतानाच ती सर्वांना परवडणारी कशी होईल हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईसारख्या (mumbai) शहरात आजही सायकल चालवली जाते, यासाठी स्वतंत्र ट्रॅक असणे गरजेचं आहे. ही सर्व विकासकामे करत असतानाच पर्यावरण रक्षण करण्यावरही भर देण्यात येत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नगरविकास मंत्री  तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील हे महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प आहेत. यामुळे वाहतुकीत मोठी सुधारणा होईल. वेळ आणि पैशाची बचत होईल. मुंबई आणि नवी मुंबई तसंच रायगड जिल्ह्याला जोडणारे हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या पायाभूत सुविधा उभारणी कामांबरोबरच एमएमआरडीएने कोविड संकटकाळात मोठी कोविड सेंटरही उभारली. हे उल्लेखनीय आहे. एमएमआरडीएचे सर्व प्रकल्प वेगात प्रगतीपथावर असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा- एसआरएची घरं ५ वर्षानंतर विकता येणार

शिवडी ते वरळी उन्नतमार्ग

मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या मुंबई बाजूकडील वाहतूक विकीरण व्यवस्थेकरिता शिवडी ते वरळी उन्नतमार्ग प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात आलं आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पावरुन येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळी पर्यंत पोहचून वांद्रे – वरळी सागरी सेतूने वांद्रे येथून पश्चिम उपनगरांकडे जाता येईल. प्रस्तावित उन्नत मार्गाची लांबी सुमारे ४.५ कि.मी इतकी आहे.

कलानगर जंक्शन, वांद्रे (पू.), मुंबई इथे उड्डाणपूल

सद्यस्थितीत कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे– कुर्ला जोडरस्तासहित इतर तीन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतुक सुरळीत होऊन वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

वांद्रे- कुर्ला संकुलातील जी-ब्लॉकमध्ये पदपथ व जंक्शन

वांद्रे कुर्ला संकुलातील प्रस्तावित नवीन मेट्रो मार्गामुळे पादचाऱ्यांची संख्या वाढणं अपेक्षित आहे. जंक्शनदरम्यानच्या  रस्त्यांवर  सुरक्षित सायकल ट्रॅक, वर्दळमुक्त पादचारी क्षेत्र इत्यादी सुविधा वाढविणे, पार्किंग, इ- चार्जिंग, आसनव्यवस्था, कचराकुंड्या, बोलाड्स, वाहतूक चिन्हफलक इत्यादीसह स्ट्रीट फर्निचर इ.ची तरदूत करण्यात आली आहे.

सलग आणि सुरक्षित सायकल ट्रॅक

अस्तिवात असलेल्या झाडांची मुळांचे रक्षण करणं व नवीन झाडे लावण्यासाठी सछिद्र काँक्रिट जाळी इ. चा वापर करुन झाडांचं संरक्षण करण्याचं नियोजन

वाहनांच्या ई- चार्जिंग साठी जागा

वांद्रे कुर्ला संकुल येथील स्मार्ट वाहनतळ प्रकल्प

वांद्रे – कुर्ला संकुल व नरिमन पाँईंट येथील विविध वाहनतळांसाठी स्मार्ट पार्किंग तत्वावर स्वयंचलित वाहनतळे, वाहने पार्क करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा, ॲप विकसित करणं, पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली, वाहनतळामध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग सोलर, चार्जिंगची सुविधा, विश्रांतीगृह तसंच खानपानाची सुविधा.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा