Advertisement

अतिरिक्त वीज बिलानं नागरिक त्रस्त


अतिरिक्त वीज बिलानं नागरिक त्रस्त
SHARES

माहुल गाव - चेंबूरच्या माहुल गाव परिसरातील रहिवाशांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चार ते पाच पट विजेचं बिल येत आहे. तीन महिन्यांपूर्वी कंपनीनं जुनं वीजमीटर काढून नवीन मीटर बसवलं. तेव्हापासून वाढीव बील येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात येत आहेत. याबाबत रिलायन्स कार्यालयत अनेक हेलपाटे मारून देखील बील कमी न झाल्याने येथील रहिवाशांनी ही बाब शिवसेना शाखा प्रमुख संजय राठोड यांच्या कानावर घातली. त्यानुसार त्यांनी याबाबत रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना पत्र दिलं आहे. शिवाय यावर लवकरच तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी कंपनीला दिला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा