Advertisement

ठाणे खाडी पुलावरील टोलबाबत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर?

एमएसआरडीसीने मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू केल्याने, ठाणे खाडी पुलाच्या टोलवसुलीच्या अधिकारांवर नियंत्रण राखणे अपेक्षित आहे.

ठाणे खाडी पुलावरील टोलबाबत दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर?
SHARES

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सुरू करून ठाणे खाडी पुलावरील (TCB) टोल हटवण्याच्या आश्वासनावर महाराष्ट्र सरकारने पाठ फिरवल्याचा आरोप होत आहे. सुरुवातीला ठाणे खाडे पुलावरील टोल हटवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण अजूनही TCB वापरण्यासाठी प्रवाशांकडून शुल्क आकारले जाईल.

जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी द्वारे 2016 च्या सर्वेक्षणात, राज्य सरकारने MTHL च्या उद्घाटनानंतर विद्यमान TCB (ठाणे खाडी पूल) वरील खाजगी वाहन टोल काढून टाकण्यास सहमती दर्शविली. तथापि, MTHL या आठवड्यात सुरू होणार असल्याने ठाणे खाडी पूलावरील टोल रद्द करण्यात येईल अशी आशा होती. पण अद्याप टोल सुरूच राहणार आहे.

सर्वेक्षणानुसार, "सध्याच्या ठाणे खाडी पुलावरील खासगी वाहनांचा टोल MTHL सुरू करताना काढला जाईल, हे सरकारी धोरणात नमूद केले आहे."

मुंबईतील टोलची प्रथा 2002 पासून सुरू झाली, जेव्हा महाराष्ट्र सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या गाड्यांना पाच प्रवेश बिंदूंवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत ही कार्यवाही करण्यात आली. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे-मुलुंड, दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे पाच एंट्री पॉइंट होते.

2010 मध्ये, मुंबई एंट्री पॉइंट टोल लिमिटेड (MEPL) या खासगी कंपनीला टोल संकलनाचे अधिकार सप्टेंबर 2027 पर्यंत वाढवण्यात आले होते. सध्याचा करार 2027 मध्ये संपल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण टोल प्लाझावर नियंत्रण ठेवेल.

एमएसआरडीसीने मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू केल्याने, ठाणे खाडी पुलाच्या टोलवसुलीच्या अधिकारांवर नियंत्रण राखणे अपेक्षित आहे.

बांधकाम खर्च वसूल करण्यासाठी, MSRDC ने 2036 पर्यंत रस्त्यावर टोल आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वाशी टोल प्लाझा हा नवी मुंबई ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षात, टोल प्लाझातून 2.35 कोटींहून अधिक गाड्या गेल्या, ज्यामध्ये खाजगी वाहनांनी टोलमध्ये सुमारे 70 कोटी रुपयांचा वाटा उचलला.



हेही वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर

मालाड ते अंधेरी दरम्यानचा प्रवास 6 मिनिटांत करता येणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा