गिरगांव - गिरगांवमधील कुंभारवाड्यात असलेल्या भाजी मार्केटमध्ये नाल्यातून काढलेला कचरा गेले काही दिवस तसाच पडून आहे. तसंच त्या नाल्याच्या वाहत्या पाण्याचाही नागरिकांना सामना कराव लागत आहे. तसंच तिथल्या नागरिकांकडून कचराकुंडीऐवजी
रस्त्यावरील कच-याच्या ढिगात कचरा टाकण्यात येत आहे. या कच-यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय.ढिगा-याच्या बाजूला भाजीवाले सुद्धा बसतात.येथे जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत कचराकुंड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी कचरा रस्यावरच जमा होतोय. मात्र या सर्व परिस्थितीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय.