Advertisement

'५ दिवसांचा आठवडा करा', सरकारी बाबूंची मागणी!

राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना आठवड्यातून २ दिवसांची सुट्टी मिळाल्यास त्यांची कार्यक्षमता अधिक वाढेल. शिवाय एक दिवस घरातील कामकाजासाठी आणि दुसरा दिवस स्वत:साठी देणं सरकारी कर्मचाऱ्यांना शक्य होईल, असं अधिकारी महासंघाचं म्हणणं आहे.

'५ दिवसांचा आठवडा करा', सरकारी बाबूंची मागणी!
SHARES

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शासकीय कामकाजासाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर निवेदनही देण्यात आलं आहे.


म्हणून ५ दिवसांचा आठवडा

राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना आठवड्यातून २ दिवसांची सुट्टी मिळाल्यास त्यांची कार्यक्षमता अधिक वाढेल. शिवाय एक दिवस घरातील कामकाजासाठी आणि दुसरा दिवस स्वत:साठी देणं सरकारी कर्मचाऱ्यांना शक्य होईल, असं अधिकारी महासंघाचं म्हणणं आहे.


तर, कामकाजाची वेळ अशी 

केंद्रातील कर्मचारी आणि अधिकारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात. त्यानुसार महाराष्ट्रात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळही तीच करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या या निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे जर ५ दिवसांचा आठवडा लागू झाला तर सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ किंवा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.०० अशी शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ होऊ शकते.


तास भरून देण्यास तयार

५ दिवसांचा आठवडा रद्द करून तो ६ दिवसांचा आठवडा करावा अशी पाचव्या वेतन आयोगाने शिफारस केली होती. जी केंद्र सरकारने फेटाळून लावली होती. सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात आता ५ दिवसांच्या आठवड्याची शिफारस आहे. १९८८ पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी मिळते. आता केंद्राप्रमाणे राज्यात ५ दिवसांचा आठवडा लागू झाल्यास शासकीय कामकाजाच्या निकषाप्रमाणे तास भरून देण्याची कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तयारी असल्याचं महासंघाच्या अध्यक्षांनी सांगितलं.



हेही वाचा-

मुंबईत वैद्यकीय सेवा पुरवणार ५ फिरते दवाखाने

केईएममध्ये स्लॅब कोसळून तीन कामगार जखमी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा