Advertisement

राज्यभरात ८०० उमेदवारांचे अर्ज बाद

८०० उमेदवारांचे अर्ज त्रुटी अभावी नामंजूर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत ४ हजार ७४३ उमेदवार आपले नक्षीब आजमवून पाहणार आहेत.

राज्यभरात ८०० उमेदवारांचे अर्ज बाद
SHARES

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरातून ५ हजार ५४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यातील ८०० उमेदवारांचे अर्ज त्रुटींमुळे नामंजूर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ४ हजार ७४३ उमेदवार आपले नशीब आजमावून पाहणार आहेत. त्यातच सोमवारचा  दिवस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोरांची मनधरणी करण्यात प्रमुख पक्षांना यश आल्यास अनेक उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात.

रविवारी छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघांत ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघांत ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघांत १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघांत ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघांत १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्याअसे ते म्हणाले.त ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघांत १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघांत ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघांत १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघांत ६६ उमेदवार, गोंदिया जिल्ह्यात ४ मतदारसंघांत ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघांत ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघांत ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघांत १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघांत ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघांत ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघांत ८१ उमेदवार रिंगणात असतील.

जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघांत १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघांत २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघांत २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघांत ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघांत २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघांत २७६ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघांत ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघांत ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघांत ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघांत १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघांत २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघांत १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघांत ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघांत २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघांत १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघांत ४० उमेदवार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघांत २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघांत १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघांत १११ उमेदवारांचे अर्जे वैध ठरले असल्याची माहिती दिलीप शिंदे यांनी दिली.



हेही वाचा -

'हे' ४ दिवस दारुविक्री बंद

Shiv Smarak Scam: भाजपच्या भ्रष्टाचाराचा ‘असा’ केला भांडाफोड- सचिन सावंत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा