मानखुर्द - मोदी सरकारच्या नोट बंदीमुळे सामान्य जनतेचे आद्यापही मोठे हाल होत आहेत. असा आरोप करत शनिवारी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. शासनाच्या या नोट बंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याशिवाय 50 दिवसात सर्वकाही सुरळीत होईल असे अश्वासन मोदी यांनी दिले होते. मात्र अद्यापही नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने मोदी सरकाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढल्याचं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.