Advertisement

भाजप घाबरली म्हणून संजय राऊत यांना अटक करण्यास लावलं : सुनील राऊत

संजय राऊत यांना खोट्या प्रकरणात अडकवलं जात असून त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली.

भाजप घाबरली म्हणून संजय राऊत यांना अटक करण्यास लावलं : सुनील राऊत
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी 11 वाजून 38 मिनिटाला अटक करण्यात आली. संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत माहिती देताना सुनील राऊत म्हणाले आहेत की, ''संजय राऊत यांना खोट्या प्रकरणात अडकवलं जात असून त्यांना अटक करण्यात आली आहे. उद्या सकाळी साडे नऊ वाजता त्यांना जे जे रुग्णालयार मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. आज जी केस करण्यात आली आहे, यामधे पत्रा चाळीचा उल्लेख नाही. त्यामध्ये मागच्या ज्या काही 50 लाख रुपयांच्या ट्रांजेक्शन झाले होते, त्याचा उल्लेख आहे.''

ते पुढे म्हणाले, ''संजय राऊत यांची तब्येत व्यवस्थित आहे. आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. सत्याचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे.''

तसंच भाजपा घाबरली म्हणून संजय राऊत यांना अटक करण्यास लावल्याचा आरोपही सुनील राऊत यांनी केला आहे. 

दरम्यान, संजय राऊत यांना सोमवारी ११.३० वाजता न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

सायंकाळी 5.30 पासून त्यांची ईडी कार्यलयात चौकशी सुरू होती. यानंतर आता त्यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा