Advertisement

महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करताना 'मुंबई'करांना विसरू नका - अतुल भातखळकर

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे

महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करताना 'मुंबई'करांना विसरू नका - अतुल भातखळकर
SHARES

मुंबईत मोठ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावत मुंबईची तुंबई केली. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळं मुंबईतील अनेक रस्ते हे जलमय झाले होते. विशेष म्हणजे या मुसळधार पावसामुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळं मुंबईतील पुरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी भाजपा (bjp) मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्यांना विनानिकष मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. परंतु, 'ही मदत करताना मुंबईतील नुकसानग्रस्त नागरिकांना विसरू नका. मुंबईतील नुकसानग्रस्तांना सुद्धा विनानिकष भरीव मदत करावी' अशी मागणी अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी केली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं (mumbai rains) झोपडपट्टी, चाळीत राहणारे नागरिक, छोटे दुकानदार, मध्यम वर्गीय यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. चेंबूर, मुलुंड या ठिकाणी दरड कोसळून ४० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हनुमाननगर, पोयसर, दिंडोशी, गोवंडी, निबारपाडा, विक्रोळी या परिसरात शेकडो घरे जमीनदोस्त झाली, हजारो घरांमध्ये पाणी जाऊन घरगुती साहित्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

ठाकूर कॉम्प्लेक्स सह अनेक ठिकाणी पाणी साचून हजारो ऑटोरिक्षा, दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. २००५ साली झालेल्या नुकसानापेक्षा अधिकचं नुकसान होऊन सुद्धा अद्याप पावतो साधे नजर पंचनामे सुद्धा करण्यात आलेले नाहीत. सरकारी अधिकारी फक्त खावटी अनुदान देऊ असे संतापजनक उत्तर देत आहेत. बेसुमार पावसामुळं नुकसान झालेल्या मुंबईकरांना आता तरी मदत करावी, अन्यथा मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मोठं जनआंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.



हेही वाचा -

अर्धवातानुकूलित लोकल प्रवासाला सर्वाधिक प्रवाशांची मान्यता

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा