Advertisement

आंदोलन केलं की अटक, कुणी काही बोललं की अटक, हे थांबणार केव्हा?- फडणवीस

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बाजू मांडायला गेल्यास सरकार थेट अटक करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला आहे.

आंदोलन केलं की अटक, कुणी काही बोललं की अटक, हे थांबणार केव्हा?- फडणवीस
SHARES

शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बाजू मांडायला गेल्यास सरकार थेट अटक करत असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. 

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, म्हणून आंदोलन केलं तर कारागृहात डांबलं! शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन ‘मातोश्री‘वर भेटण्यासाठी रेल्वेने निघाले, तर खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध! २५-५० हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?

निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती, त्यांचं दुःख समजून घेतलं असतं, तर किमान आपलं म्हणणं ऐकून घेतल्याचं तर समाधान शेतकऱ्यांना मिळालं असतं.

आंदोलन केलं की अटक, कुणी काही बोललं की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? असा प्रश्न देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली. यावरुनच फडणवीस यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. 'शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केलं. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळी दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो,' असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा