वांद्रे - पालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये बरीच घासघीस सुरू आहे. गुरुवारी संध्याकाळी भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भाजपाच्या मुंबईतील 114 नावांच्या यादीबाबत चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 114 उमेदवारांच्या नावांच्या यादीला हिरवा कंदील दिला आहे. हीच यादी आता शिवसेनेला देण्यात येणार आहे. शुक्रवारी या यादीवर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा अपेक्षित आहे.