Advertisement

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठी नियोजन सुरू- अनिल परब

राज्यांतर्गत अडकलेल्या रहिवाशांनासुद्धा मूळ गावी पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत असल्याची महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठी नियोजन सुरू- अनिल परब
SHARES

महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या राज्यांमधील समन्वयातून या सर्व परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात सुखरूप पाठवलं जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील रहिवाशांनाही महाराष्ट्रात परत आणलं जाईल तसंच राज्यांतर्गत अडकलेल्या रहिवाशांनासुद्धा मूळ गावी पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत असल्याची महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

बस, रेल्वेची व्यवस्था

परब म्हणाले, या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे आणि  बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ग्रुप लीडरच्या माध्यमातून नोंदणी करावी. नोंदणी करत असताना नाव, सध्या राहात असलेला पत्ता, कुठे जाणार आहे त्या ठिकाणाचा पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर यांची नोंद करावी. आणि त्यांना बसने प्रवास करायचा आहे का? रेल्वेने याचीही नोंद त्यात करावी.   

हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

जाणाऱ्या लोकांची संख्या जर १ हजार असेल तर त्यांच्या प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात येईल आणि २५ संख्या असेल तर बसची व्यवस्था करण्यात येईल. सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांचं तपासणी प्रमाणपत्र सोबत देण्यात येईल.

हाॅटस्पाॅटमध्ये परवानगी नाही

राज्यांतर्गत अडकलेले रहिवाशांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र एखाद्या शहरात किंवा भागात कंटेटमेंट झोन, हॉटस्पॉट जाहीर केलेल्या ठिकाणी, जर त्यांना जायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणाहून जाण्यासाठी परवानगी मिळणार नाही.

प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर यासाठी  नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी समन्वय साधून शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली  जाईल. लोकांनी सहकार्य करावे, गर्दी  करू नये, असं आवाहनही परब यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा