जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून
संपूर्ण कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी मंगळवारी नाशिकहून निघालेला महाराष्ट्र किसान सभेचा लाँगमार्च रविवारी संध्याकाळी शीव येथील सोमय्या मैदानापर्यंत पोहोचला. शेतकऱ्यांच्या या लाँगमार्चला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे हा लाँगमार्च सोमवारी दुपारी मंत्रालयावर मोठ्या संख्येने धडकणार आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या विशाल मोर्चामुळे संपूर्ण दिवसभर जनजीवन विस्कळीत झाल्याचा अनुभव गाठिशी असल्यामुळे शेतकऱ्यांचा हा मोर्चा सोमवारी निघण्याऐवजी रविवारी रात्रीच आझाद मैदानात पोहोचला.
विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता
सर्व मोर्चेकरी हे आझाद मैदानात बसतील आणि सकाळी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. त्यामुळे सोमवारी मुंबईकरांना तसेच दहावीच्या मुलांना कोणताही त्रास होणार नाही, असा विचार करून मोर्चेकऱ्यांनी हे मान्य केल्याचं समजतं.