काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी अत्यंत विनोदी पद्धतीने मुंबईतल्या गंभीर प्रश्नाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. यावेळी नितेश राणे यांनी कपिल शर्माचे मास्क घालून मुख्यमंत्री फडणवीस यांना मुंबईकरांच्या समास्यांबाबत सवाल केले आहेत. तसेच मुख्यमंत्री कपिल शर्मा यांचे लगेच ऐकतात. 'मग सामान्य मुंबईकरांचीही दखल द्या' असा टोलाही लगावला आहे.