Advertisement

'मॅग्नेटिक महाराष्ट्र'तून ३५ लाख रोजगार: सुभाष देसाई

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेतून १० लाख कोटी रुपयांच्या उद्योगाच्या आश्वासनाचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे. विविध उद्योगांच्या ४,५०० हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याचं नियोजित असून यातून ३५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

'मॅग्नेटिक महाराष्ट्र'तून ३५ लाख रोजगार: सुभाष देसाई
SHARES

'मॅग्नेटिक महाराष्ट्र' परिषदेतून १० लाख कोटी रुपयांच्या उद्योगाच्या आश्वासनाचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आहे. विविध उद्योगांच्या ४,५०० हजार सामजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याचं नियोजित असून यातून ३५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.


आधी ८ लाख कोटींची गुंतवणूक

येत्या १८ जानेवारीला 'एमएमआरडीए'च्या प्रांगणात होणाऱ्या 'मॅग्नेटिक महाराष्ट्र -कन्व्हर्जन्स' २०१८ या परिषदेचं उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेची माहिती गुरूवारी उद्योगमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यापूर्वी 'मेक इन इंडिया' या परिषदेचं यजमानपद राज्याने स्वीकारलं होते. २०१६ मध्ये आयोजित या परिषदेत ८ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले होते, त्यापैकी सुमारे ६१ टक्के करारांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याची माहिती देसाई यांनी दिली.


कौशल्य विकासावर भर

राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी १२ नवीन धोरणं जाहीर करण्यात आली आहेत. यात लॉजिस्टीक पार्क, वस्त्रोद्योग, फिन्टेक, जी. एस. टी. साठीचं धोरण इत्यादींचा समावेश आहे. राज्य औद्योगिक धोरणालाही ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रोजगार निर्मितीसह कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. उद्योग विभागाच्या अखत्यारितील जागांवर २ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे, असंही देसाई यांनी सांगितलं.


‘मैत्री’ योजनेला सकारात्मक प्रतिसाद

पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये राज्य अग्रेसर असून औरंगाबाद, नागपूर, नगर या ठिकाणी अद्ययावत औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहेत. संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या आयुधांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एकत्रीतपणे मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मैत्री’ या एक खिडकी योजनेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार झाल्याचं ते म्हणाले.


'महा उद्योगरत्न' पुरस्कार रजनी

राज्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान, निर्यात या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील ४७ मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच राज्यातल्या नवोदित व तरुण व्यावसायिकांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने या आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र स्टार्ट अप अंडर ३०’ या स्पर्धेच्या विजेत्यांना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र-कन्व्हर्जन्स २०१८ स्टार्टअप अवार्डस अंडर ३०’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा