भाजपकडे बहुमत असल्यासं त्यांनी जरूर सरकार स्थापन करावं, परंतु महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरू नये. भाजपकडून राष्ट्रपती राजवट लादण्याचं पाप सुरू असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले याची माहिती देण्यासाठी राऊत यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत म्हणाले की, २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव यांनी जी भूमिका मांडली होती, त्यात कुठलाही बदल झालेला नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, या भूमिकेवर ते ठाम आहेत. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत.' याचा पुनरुच्चारही राऊत यांनी केला.
Sanjay Raut, Shiv Sena: We have the numbers to make our own Chief Minister, we don't need to show that here, we will show that on the floor of the house. We have alternatives, we don't speak without options and alternatives. #Maharashtra pic.twitter.com/IPqf3BiCex
— ANI (@ANI) November 7, 2019
हेही वाचा-
उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर भाजपचं मौन, राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने पाऊल?
मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम, आमदारांच्या बैठकीत एकमुखाने निर्णय