Advertisement

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार नारळ?


राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार नारळ?
SHARES

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता असून, यामध्ये काही अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

येत्या 31 ऑक्टोबरला सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सविस्तर मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी हे संकेत दिलेत.


राणेंची लागणार वर्णी?

मंत्रिमंडळ विस्तारात स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापन करून एनडीएत दाखल झालेल्या नारायण राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे.


अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार नारळ?

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एमपी मिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप आहे. एआयडीसीतील अधिसूचित जमिनींपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आहे. या दोघांनीही मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली होती. याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही छाप उमटवणारं काम केलेलं नाही. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. देशभर राज्याची बेअब्रू झाली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत.



हेही वाचा - 

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा