Advertisement

बावनकुळे चीनचे समर्थक आहेत का? - सचिन सावंत

चंद्रशेखर बावनकुळे हे चीनचे समर्थक आहेत का?, असा प्रश्न विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे.

बावनकुळे चीनचे समर्थक आहेत का? - सचिन सावंत
SHARES

मुंबईतील वीज खंडित होण्याचा प्रकार हा पूर्णपणे मानवनिर्मित असून त्यात चीनने केलेल्या सायबर हल्ल्याचा हात असल्याचा गृहमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी केलेला दावा आपलं अपयश झाकण्यासाठी होता, असा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे हे चीनचे समर्थक आहेत का?, असा प्रश्न विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे.

सचिन सावंत (sachin sawant) यांनी ट्विट करत करत, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे चीनचे समर्थक आहेत का? चीनची भाषा का बोलत आहेत? चीनच्या रेड इको या ग्रुपचा हात असून शकतो असा अमेरिकेच्या रेकॉर्डेड फ्युचर या कंपनीने भारताच्या सर्टीनला अहवाल दिला आहे. सायबर सेल ने ही शक्यता वर्तवली आहे. चीनची चौकशी केली तर भाजपला (bjp) त्रास का? असे प्रश्न विचारले आहेत.

गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर २०१९ रोजी मुंबईत झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणी महाराष्ट्र सायबरने केलेल्या तपासाचा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांना नुकताच सोपवला.

हेही वाचा- बावनकुळेंनी स्वत:चं हसं करून घेऊ नये- अनिल देशमुख

मुंबईत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या प्रकरणी घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीकोनातून तपास करणं आवश्यक वाटल्याने ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी या प्रकरणाच्या अधिक तपासाबाबत त्यावेळी विनंती केली होती. त्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र सायबर विभागाला देण्यात आले होते. 

रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनॅलिसिस या अमेरिकन कंपनीने २८ फेब्रुवारी रोजी एक अहवाल जारी केला. या अहवालात त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईच्या इलेक्ट्रीकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चीन देशाने मालवेअर (व्हायरस) टाकला असल्याची शक्यता आहे. अशाच प्रकारची बातमी १ मार्च रोजी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातही तसंच वॉलस्ट्रीट जर्नल मध्येही प्रसिद्ध झाली आहे, अशी माहिती अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी यावेळी दिली होती. 

त्यावर टीका करताना, वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पूर्णत: मानवनिर्मित आहे. यात कोणत्याही देशाचा संबंध नाही. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली, ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत चीनच्या सायबर हल्ल्याचं कारण देत जनतेची दिशाभूल करणं सुरू केलं आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

(maharashtra congress spokesperson sachin sawant slams chandrashekhar bawankule on mumbai electricity failure)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा