हॉकर्स पॉलिसी (फेरीवाला धोरण) अंमलात येईल तेव्हा ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच मिळाले पाहिजेत, अशी मागणी मनसे प्रवक्ते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडे केली आहे. एवढंच नाही, तर मनसे त्यासाठी स्वत: पुढाकार घेईल, अशी ठाम भूमिकाही देशपांडे यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या 'फेसबुक लाइव्ह'मध्ये बोलताना मांडली.
अनधिकृत फेरीवाल्यांवर ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, त्या पद्धतीने ती होत नव्हती म्हणून मनसेने आपल्या स्टाईलने त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळेच आज हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली. यापुढे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करून फेरीवाल्यांकडून काहीही विकत घेऊ नका, जेणेकरून तुम्हालाच त्रास होणार नाही, यासाठी जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
राज्याच्या विकासात मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच - नितेश राणे