Advertisement

विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या- नितीन गडकरी

भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे काम विरोधकांना सहन होत नाही. त्यामुळेच ते जातीयवाद वाढविण्याचा व विकासाचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

विरोधकांच्या खोट्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या-  नितीन गडकरी
SHARES

भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे.  हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले सरकार पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त असून भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर द्यावे, असा अादेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत बोलत होते.


विरोधकांना सहन होत नाही

श्रद्धेय अटलजी यांच्या व अनेक कार्यकर्त्यांच्या त्याग, परिश्रम व समर्पणामुळे भाजपा देशातील सत्ताधारी पक्ष झाला असून भाजपाला देशाचे भवितव्य घडविण्याची संधी मिळाली आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गाव, गरीब, किसान यांचा विकास करण्याबरोबरच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे. भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारचे विकासाचे काम विरोधकांना सहन होत नाही. त्यामुळेच ते जातीयवाद वाढविण्याचा व विकासाचा अजेंडा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.


राफेल कराराशी संबंध नाही

राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस पक्ष आरोप करत आहे. पण रिलायन्सबरोबर राफेल विमान बनविणाऱ्या कंपनीचा करार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतानाच झाला होता. या कंपनीने रिलायन्सप्रमाणेच सुट्या भागांसाठी २२ कंपन्यांशी करार केला आहे. या करारांशी भाजपा सरकारचा काहीही संबंध नाही. मोदी सरकारने यशस्वी वाटाघाटी केल्यामुळे सुसज्ज लढाऊ विमाने चाळीस टक्के स्वस्त मिळाली आहेत. या विषयातील सर्व माहिती घेऊन भाजपा कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आरोप खोडून काढावेत व जनतेला संभ्रमित करण्याचे विरोधकांचे प्रयत्न खोडून काढावेत.



हेही वाचा -

छगन भुजबळांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा लिलाव 

दसरा मेळाव्यात ५ लाखांचा जनसमुदाय जमवा, शिवसेनेच्या नेत्यांचे कडक निर्देश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा