Advertisement

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पालघर हत्या प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल

पोलिसांच्या डोळ्यादेखत जमावाने तिघांना काठ्यांनी अक्षरश: तुडवून मारलं. हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा या घटनेमुळे प्रश्न निर्माण होतोय.

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? पालघर हत्या प्रकरणावरून फडणवीसांचा सवाल
SHARES

पोलिसांच्या डोळ्यादेखत जमावाने तिघांना काठ्यांनी अक्षरश: तुडवून मारलं. हा प्रकार अत्यंत लाजीरवाणा आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा या घटनेमुळे प्रश्न निर्माण होतोय. पोलीस कुणाच्या दबावाखाली आहे का असा प्रश्न देखील यामुळे तयार होतोय. असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

सोशल मीडियावर टाकलेल्या व्हिडिओद्वारे फडणवीस म्हणाले, पालघरचं माॅब लिंचिंगचं प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे. ज्या प्रकारे लोकांनी पोलिसांच्या समोर अक्षरश: काठ्यांनी तुडवून मारलं आणि पोलीस काहीच करत नव्हते, ही अवस्था अत्यंत लज्जास्पद आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? असा या घटनेमुळे प्रश्न निर्माण होतोय. पोलीस कुणाच्या दबावाखाली आहे का असा प्रश्न देखील यामुळे तयार होतोय. त्यामुळे या घटनेची तात्काळ उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. पोलिसांवर आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

हेही वाचा - पालघर हत्या: योगी आदित्यनाथांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, कडक कारवाईची मागणी

दरम्यान, पालघरच्या डहाणूमध्ये दोन साधू आणि एका ड्रायव्हरच्या हत्याप्रकरणाची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भातील माहिती योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यांत ते म्हणतात की, महाराष्ट्रातील पालघरमध्ये जुना आखाड्याचे स्वामी कल्पवृक्ष गिरी आणि स्वामी सुशील गिरी तसंच त्यांचा ड्रायव्हर नीलेश तेलगडे यांची दुर्दैवी हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली आणि या घटनेतील जाबाबदार आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण? 

गुरूवार मध्यरात्री दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. ही घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले इथं घडली होती.  

या घटनेची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरीही होते. या सर्वांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने शांत होण्याऐवजी पोलिसांच्या गाडीवरही हल्ला करत दगडफेक केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना घडल्याने राज्यभर खळबळ उडाली होती. 

हेही वाचा- पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा