राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी होणारं मतदान शांततेत पार पडावं यासाठी राज्यभरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव दल, गुजरात राज्य राखीव दलाचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, दुर्गम भागासाठी वायरलेस सेट तसेच संवेदनशील केंद्राच्या टेहाळणीसाठी ड्रोनचाही वापर करण्यात येणार आहे.
मतदारांना मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी गुगल मॅपमध्ये सर्व
मतदान केंद्रे टॅग केल्यानं मतदान केंद्र नेमकं कुठं आहे,
किती
जवळ किंवा लांब आहे हे मतदारांना
घर बसल्या समजणार आहे.
राज्यातील २७६२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३५० तुकड्यांसह सुमारे तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात करण्यात आला आहे.
मुंबई जिल्ह्यातील १० विधानसभा
मतदारसंघात २५ लाख ९ हजार ५१८
इतके मतदार आहेत.
सुलभ
मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात
२५९२ मतदान केंद्रे आहेत.
मतदारांनी
मतदानाचा हक्क बजावून आपले
राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं,
असे
आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे
यांनी केलं आहे.
या निवडणुकीसाठी २१ हजार
अधिकारी - कर्मचारी
कार्यरत आहेत.
तसंच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी
पोलीस कर्मचारी,
राज्य
राखीव पोलीस दला व केंद्रीय
औद्योगिक सुरक्षा दल यांचं जवानदेखील तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे
जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक अधिकारी जोंधळे यांनी
दिली.
मतदारांनी
सोबत वैध
मतदार ओळखपत्र आणणं गरजेचे आहे.
सदर
ओळखपत्र नसल्यास निवडणूक
आयोगानं निश्चित केलेल्या
११ प्रकारच्या छायाचित्र
ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र
मतदानाला जातांना सोबत घेऊन
जावं.
सर्व मतदान केंद्रावर पुरुष व महिला मतदारांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था, मदत केंद्राची व्यवस्था, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी व शौचालय या सुविधा तसेच मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक इत्यादी सुविधा असणार आहेत. मतदान केंद्रांच्या ठिकाणी बाल संगोपन केंद्रांची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
हेही वाचा -
Maharashtra Assembly Elections 2019 : मतदानासाठी मुंबई, ठाणे सज्ज