Advertisement

आमच्याकडे १६२ होते, बहुमत चाचणीवेळी १७० असतील – संजय राऊत


आमच्याकडे १६२ होते, बहुमत चाचणीवेळी १७० असतील – संजय राऊत
SHARES

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या १६२ आमदारांनी सोमवारी रात्री एकजूट असल्याची शपथ घेतली. मुंबईतील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांना त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांच्या टीकेला प्रत्यूत्तर देताना 'बहुमत चाचणी होईल तेव्हा आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असेल' असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेची भूमीका

मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमीका मांडली. तसंच, 'राज्यपालांच्या साक्षीनं संविधानाची हत्या करण्यात आली' असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याशिवाय, 'ग्रँड हयात या हॉटेलमध्ये झालेला कार्यक्रम हा महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन नव्हतं, तर १६२ आमदार सोबत आहेत हे राज्यपाल आणि राष्ट्रपतींना दाखवलं' असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

खोटं बहुमत

'राज्यपालांना खोटं बहुमत दाखवत मुख्यमंत्र्यांना चोरट्यासारखी शपथ देण्यात आली होती. कोणाकडे बहुमत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला कळावं यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो. हेच संविधान बाबासाहेबांनी तयार केलं होतं का? अशी विचारणा यावेळी संजय राऊत केली. ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांना सरकार स्थापन करण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवालही त्यांनी विचारला. संविधानात ज्याच्याकडे बहुमताचा आकडा आहे त्याला पंतप्रधान, मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली जाते. पण अजित पवारांनी दाखवलेल्या खोट्या पत्रावर विश्वास ठेवून शपथ देण्यात आली. राज्यपालांच्या साक्षीनं संविधानाची हत्या करण्यात आली' असंही राऊत यांनी म्हटलं.

१३० आमदार उपस्थित

बहुमत आहे तर मग लांब का पळत आहात? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपाला केला. नारायण राणे यांनी फक्त १३० आमदार उपस्थित होते यासंबंधी प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं योग्य नाही, नारायण राणे काहीही बोलत असल्याचं म्हणत उत्तर देणं टाळलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना जयंत पाटीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते असल्याचं त्यांनी सांगितलं.


आशिष शेलारांवर टीका

आशिष शेलार यांच्यावर टीका करताना, महाराष्ट्रात असे अनेक खोटारडे लोक फिरत आहेत असा टोला त्यांनी लगावला. महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड करु नका असंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं आहे. 'मी एक शिवसैनिक आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असा प्रयत्न असून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'अजित पवार जागतिक स्तरावरचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. कालपर्यंत आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते. राज्य कसं चालवायचं सांगत होते. अशा महान विचारांची माणसं महाराष्ट्रात जन्माला आली आहेत', असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात बुधवारी बहुमताची चाचणी- सर्वोच्च न्यायालय

अजित पवारांशी कोणताही संबंध नाही- धनंजय मुंडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा