मुंबई - लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेला सुगीचे दिवस आल्याचं म्हणायला हरकत नाही. 18 डिसेंबरला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकलच्या विकासासाठी 40 हजार कोटींची घोषणा केलीय. या कामांची अंमलबजावणी पुढच्या वर्षांपासून सुरू होतील अशी घोषणाही सुरेश प्रभूंनी केली. या कामांमध्ये पश्चिम रेल्वेमध्ये 15 डब्ब्यांच्या 12 नवीन लोकल सुरू करणार असल्याचंही सुरेश प्रभू यांनी सांगितलं. पश्चिम रेल्वेची गर्दी पाहता यामुळे प्रवाशांना फायदा होणारेय.