
महाराष्ट्र सरकारवर पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. कारण राज्य विधानसभेच्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते (LoP) पद अद्यापही रिक्त असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती यापूर्वी कधी पाहायला मिळाली नसल्याचे म्हटले जात आहे. या घडामोडीमुळे विधानमंडळातील लोकशाही प्रक्रियेची मजबुती धोक्यात येऊ शकते, असे निरीक्षकांचे मत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील यावर टीका केली आहे.
महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचे चिन्ह, नाव, वेगवेगळे असले तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजपा) या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अॅनाकोंडा. आता या अॅनाकोंडाचा प्रत्यय महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा
