
केंद्र सरकारने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले.
फडणवीस यांनी सांगितले की, नव्याने तयार केलेल्या विकास आराखड्याला सर्व कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर हा पुतळा परिसरात उभारण्यात येणार आहे.
तसेच ही स्थापना या ऐतिहासिक इमारतीच्या सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असेल. ते विधानसभेतील चर्चेदरम्यान विचारलेल्या शंकांना उत्तर देत होते.
शिवसेना (यूबीटी)चे आमदार भास्कर जाधव यांनी या ऐतिहासिक स्थानकाचे ज्याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर झाले आहे. जाधव यांनी CSMTचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, या स्थळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला साजेसा असा स्मारक नक्कीच लाभला पाहिजे.
यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “केंद्र सरकारने आधीच निर्णय घेतला आहे. राज्याकडून नवीन प्रस्तावाची गरज नव्हती. पुनर्विकसित CSMT च्या मास्टर प्लॅनमध्ये हा पुतळा आधीच समाविष्ट केला आहे."
तसेच रेल्वे खात्याच्या राज्यमंत्रींकडून आलेले आधीचे पत्र हे जुन्या आराखड्यावर आधारित होते. सध्याच्या पुनर्विकास आराखड्यावर नाही, अशी स्पष्टताही त्यांनी दिली. फडणवीस यांनी ट्विटर वरही लिहिले, “नवीन आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल.”
बीएमसी निवडणुकांना जानेवारी 2026 काही आठवडे शिल्लक असताना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या पुतळ्याचा मुद्दा महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील प्रमुख राजकीय विषय ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
