अनेक वर्ष वादाचं विषय ठरलेलं आणि जम्मू-काश्मिरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत शिफारस केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी परिपत्रकही जाहीर केलं. तसंच, अमित शहा यांनी ३७० कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं. त्यानंतर अखेर कलम ३७० व ३५ अ जम्मू आणि काश्मीरमधून हटविण्यात आलं.
कलम ३७० व ३५ अ जम्मू आणि काश्मीरमधून हटविल्यानंतर सर्वच स्तरावरून मोदी सरकारचं कौतुक करण्यात आलं. परंतु, हे कलम ३७० व ३५ अ काय माहिती आहे?, कलम लागू असताना जम्मू-काश्मीर कसं होतं? आणि आता हे कलम हटवल्यानंतर कसं असणार? जाणून घ्या या व्हिडीओमध्ये...