Advertisement

ठाकरे सरकार स्थिर; आपला कार्यकाळ पूर्ण करणार - शरद पवार


ठाकरे सरकार स्थिर; आपला कार्यकाळ पूर्ण करणार - शरद पवार
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटलं.

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर २ महिन्यांत त्यांना सरकार पाडायचं होतं. मग ६ महिने आणि नंतर पुन्हा ८ महिन्यांत सरकार पाडणार होते. पण, काहीच झाले नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा पवार यांनी केला.

सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडीच्या समन्सवरूनही पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. हा सत्तेचा दुरुपयाेग आहे. मलाही ईडीची नोटीस पाठविण्याचा प्रयत्न झाला. राज्य सहकारी बँकेचा मी सदस्यही नव्हतो आणि तिथे माझे खातेही नव्हते. नंतर त्यांनी ती नोटीस परत घेतली, असे पवार म्हणाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा