पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशभरात भाजपाच्या माध्यमातून विकास रॅलींचे आयोजन करण्यात येत आहे. मोदी सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात काय काय कामे केली, याची जनतेला माहिती करून देण्यासाठी जाहिरातींचाही आधार घेण्यात येत आहे. सोबतच पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कामकाजाचा हिशोब लोकांना देत आहेत.
या सर्व घडामोडींवर सर्वसामान्यांचे काय म्हणणे आहे? मोदी सरकारने तीन वर्षांत दिलेले वचन पूर्ण केले? खरोखरच अच्छे दिन आलेत का? जाणून घेऊया खुद्द मुंबईकरांकडून...